‘इंडिया आउट ऑफ वर्क’ : लेखकद्वय सरकारला प्रश्न विचारणारे आहेत. त्यामुळे अलीकडच्या आपल्या प्रथेनुसार त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल’ असल्याचा शिक्का बसू शकतो

मात्र ते जे प्रश्न उपस्थित करत आहेत, ते टाळून भारताने २०४७मध्ये उच्च उत्पन्न गटात प्रवेश करण्याचे स्वप्न पूर्ण कसे होईल? रोजगार, अर्थव्यवस्था, शिक्षण यांमध्ये उत्पन्न झालेल्या या संकटाला लेखकद्वय ‘ट्रिपल ई क्रायसिस’ असे संबोधतात. प्रस्तुत पुस्तकाचा प्रमुख उद्देश भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील, तेव्हा देशाची गणना उच्च मनुष्यबळ विकसित असलेल्या देशांमध्ये व्हावी हा आहे........

संजय गणोरकर : “सुपात धान्य आहे आणि सुपाबाहेर शेतकऱ्यांची प्रेतं पडली आहेत असं ते शिल्प... त्यातून मला दाखवायचं होतं की, लोकांना धान्य हवंय, पण शेतकरी नकोय.”

हिवाळ्याचे दिवस होते. मोटारसायकलने निघालो होतो. माझ्यापुढे एक रिक्षा होती. त्यातून पांढर्‍या कपड्यात बांधलेल्या प्रेताचं डोकं आणि पाय बाहेर आले होते. बराच वेळ त्या रिक्षाच्या मागे होतो. मी खूप अस्वस्थ झालो. एक क्षण असा की, मला असह्य झालं. मग मी ओव्हरटेक केलं, तेव्हा मला रिक्षात तोंडाला काही न बांधलेले दोन म्हातारे आई-वडील मांडीवर प्रेत घेऊन बसले आहेत आणि रिक्षा चालवणाऱ्यानं तोंड झाकलं असल्याचं दिसलं.......